
नेपाळमधील महापुरात आतापर्यंत 538 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 1500 नागरिक बेपत्ता आहेत. तीन दिवस झाले तरी या बेपत्ता नागरिकांचा शोध लागलेला नाही. नेपाळमध्ये भारतातील 290 नागरिक गेलेले आहेत. त्यांचाही काही संपर्क झालेला नाही. तर कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेले 200 लोक तिबेटमध्ये फसलेले आहेत. मात्र ते सुरक्षित आहेत. नेपाळमध्ये ग्लेशियर फुटल्याने महापूर आल्याचं सांगितलं जात आहे. भारतातही अशाच प्रकारचे 5 ग्लेशियर सरोवर आहेत. हे ग्लेशियर सरोवर अति संवेदनशील आहेत. त्यामुळे जसं नेपाळवर काल संकट ओढवलं तसं भारताच्या डोक्यावरही संकट घोंघावत असल्याचं सांगितलं जात आहे.
देशातील अति संवेदनशील सरोवरांच्या यादीत उत्तराखंडातील 13 सरोवरांचा समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंध प्राधिकरण- एनडीएमएने वर्ष 2024मध्ये देशभरातील 200 ग्लेशियर सरोवरांची यादी जारी केली होती. यातील काही सरोवरांना संवेदनशील आणि काहींना अति संवेदनशील श्रेणीत ठेवलं होतं.
कुठे आहेत हे 5 ग्लेशियर सरोवर
अति संवेदनशील श्रेणीत असलेले हे पाच सरोवर उत्तराखंडमध्ये आहेत. यातील चार सरोवर नेपाळच्या सीमेपासून जवळच पिथौरागडमध्ये आहेत. तर एक वसुधारा ग्लेशियर सरोवर चमोलीमध्ये आहे. उत्तराखंडचे आपत्ती प्रतिबंधक आणि पुनर्वसन सचिव विनोद कुमार सुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व ग्लेशियर सरोवरांची नियमितपणे पाहणी करण्यात येत आहे. सध्या तरी चिंता करण्यासारखं काहीच नाही. प्राथमिक सर्वेक्षणाच्या आधारे सरोवरांची देखभाल आणि तिथे सुरक्षेच्या उपाय योजना मजबूत केल्या जाणार आहेत.
वातावरणाचा बदलता ट्रेंड
तज्ज्ञांच्या मते, वातावरणाच्या बदलत्या ट्रेंडमुळे देशभरातील ग्लेशियर सरोवर आपत्तीच्या कारणाने संवेदनशील होत आहे. भूस्खलन किंवा हिमस्खलनच्या कारणाने या सरोवरांचा फुटण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे महापूर येऊ शकतो. केंद्र सरकारने या सर्व गोष्टींची गंभीर दखल घेऊन सर्व राज्य सरकारांना ग्लेशियर सरोवरांवर विशेष निगराणी ठेवायला सांगितलं आहे. भविष्यात सुरक्षेचे उपाय मजबूत ठेवण्यासाठी हे आदेश केंद्राने दिले आहेत. याशिवया तीन सरोवरांचं सर्वेक्षणही करण्यात आलं आहे. चमोली आणि पिथौरागड येथील हे सरोवर असल्याची माहिती, विनोद कुमार सुमन यांनी दिली आहे.
Leave a Reply