
मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी उद्या २९ ऑगस्ट पासून आंतरवलीत उपोषण सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आपण मुंबईला धडकणार असेही आव्हान मनोज जरांगे यांनी दिले आहे. आता यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मनोज जरांगे यांना कोणीतरी फिड करत आहे त्यामुळे ते असे बोलत आहेत. महत्वाच्या व्यक्तींबद्दल जी भाषा वापरली जात आहे ते सर्व रेकॉर्ड केले जात आहे. जरांगे यांना तातडीने अटक करा अशीही मागणी सदावर्ते यांनी केली आहे. एकनाथ शिंदेसह मोठ्या नेत्यांचा जरांगे यांना छुपा पाठिंबा असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply