
“संतांवर आरोप करणे ही विकास लवांडे यांची प्रवृत्ती पूर्वीपासूनच आहे. ही राष्ट्रवादीच्या निधर्मी नेत्यांची पिलावळ आहे. मौलाना-मौलवींच्या दाढ्या कुरवळण्यात यांचे आयुष्य गेलं आहे. त्यांना काय हिंदुत्व माहिती? जे मौलाना-मौलवींच्या पंक्तीत बसून राजकारण करतात, त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा काय अधिकार? विकास लवांडे यांनी आधी स्वतःकडे पाहावे. पन्नास वर्षांत हिंदूंसाठी काय केले? 2014 पासून हिंदू पर्व सुरू झाले आहे. वामपंथीयांच्या नादी लागून यांनी या देशाला निधर्मी करण्याचा प्रयत्न केला होता” अशी टीका भाजप आमदार संजय केनेकर यांनी केली.
“संजय राऊत हे ‘मुंगेरिलाल के हसीन सपने’ पाहत आहेत. त्यांच्या बोलण्याकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. ते चित्र रंगवतात आणि नंतर ते चित्र फाटलेले दिसते” असं उद्धव ठाकरे यांची निवडणूक बिनविरोध होईल या संजय राऊतांच्या वक्तव्यावर संजय केनेकर बोलले. नाशिक आयटी कंपनी प्रकरणावर बोलताना संदय केनेकर म्हणाले की, “यात कोणताही धार्मिक किंवा जातीय रंग नाही. ज्या पद्धतीने त्यांनी ‘लव्ह जिहाद’ची भूमिका डोक्यात ठेवून हे प्रकरण केले आहे, त्यामुळे निश्चितच फसवणूक झाली आहे”
औरंगजेब समर्थक कुठल्या ना कुठल्या मार्गाने डोके वर काढतात
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले, तेव्हापासून औरंगजेब समर्थक कुठल्या ना कुठल्या मार्गाने डोके वर काढत आहेत. बाबासाहेबांच्या रॅलीला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला असून, जिहादी घटकांच्या माध्यमातून हे घडले आहे. याची निश्चित चौकशी होईल” असं संजय केनेकर औरंगजेबाचा फोटो नाचवण्यावर म्हणाले.
त्या काळात त्यांनी भूतं पाहिली असतील
“काही काळ संजय शिरसाट नगरसेवक होते. त्या काळात त्यांनी भूतं पाहिली असतील. मला मात्र काही माहिती नाही. अचानक त्यांना कोणते भूत भेटले याचा शोध घ्यावा लागेल. मी सुद्धा पंधरा ते वीस वर्षे नगरसेवक होतो, पण मला कधीच कोणते भूत भेटले नाही” असं संजय केनेकर म्हणाले. संजय शिरसाट यांनी महानगरपालिकेत आत्म्याचा वावर असल्याचं वक्तव्य केलं होतं.
जी.श्रीकांत यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ‘ते सक्षम आणि चांगले अधिकारी असल्यामुळे सरकारने त्यांची विभागीय आयुक्तपदी बदली केली आहे. हा योग्य निर्णय आहे’ असं केनेकर यांनी सांगितलं.
Leave a Reply