• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धक्कादायक… SIRच्या प्रारुप मतदार यादीतून मुंबईतील 36 लाख नावे वगळली; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

September 1, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयानं महाराष्ट्राची एसआयआर-2026 प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीतून महाराष्ट्रातून 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. ही माहिती ताजी असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रातील दोन कोटी नावे वगळली गेली आहेच. पण मुंबईतील 36 लाख मतदारांची नावे या यादीतून कापली गेली आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला आहे.

महाराष्ट्रातील दोन कोटी मतदार आणि मुंबईतील 36 लाख मतदार वगळले आहेत. ही चिंतेची बाब आहे. पश्चिम बंगालमध्ये हेच केलं. पश्चिम बंगालमध्ये 85 लाख मतदार वगळले होते. टीएमसीला मतदान करणारे मतदार वगळले होते. महाराष्ट्रात असे कार्यक्रम झाले आहेत. आमचं त्यावर संशोधन सुरू आहे. मुंबईतील 36 लाख मतदार वगळले, हा आकडा साधा नाही. एका विशिष्ट धर्माचे, समाजाचे किंवा विरोधात मतदान करणारे लोक वगळण्यात आले आहेत. भाजपच्या कार्यालयात एसआरएचे फॉर्म सापडले आहेत. त्यावरही आमचे काम सुरू आहे. आमची यंत्रणा कामाला लागली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

जीडीपी वाढला तर बेरोजगारी, महागाई का?

केंद्र सरकारने जीडीपी वाढल्याचा दावा केला आहे. त्यावरही राऊत यांनी जोरदार टीका केली. मोदी खोटं बोलत आहेत. खोटे आकडे लावण्यात भाजपवाले पटाईत आहेत. त्यावर राजकारण करत आहे. जर जीडीपी वाढलाय तर देशाची परिस्थिती अशी का आहे? बेरोजगारी का वाढली? महागाई का वाढली? लोकांना नोकऱ्या का मिळत नाही? त्याचे उत्तर द्या. जीडीपी कुणाला कळतो? अमित शाह आणि पंतप्रधानांना तर जीडीपी काय माहीत आहे का? लोकांना रोजीरोटी हवी आहे. जीडीपी वाढला आहे तर 85 कोटी लोकांना 10 किलो धान्य देऊन का जगवत आहात? म्हणजे 85 टक्के लोक उपाशी आहेत, असा सवाल राऊत यांनी केला.

तुम्ही खरोखरच कारसेवेला गेला होता ना?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिराच्या लुटीवर भाष्य केलं होतं. त्यावरूनही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं. मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत. राम मंदिर लुटीची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती. त्याचा रिपोर्ट वाचायाला फडणवीस यांना द्या. एसआयटी स्थापन झाली. लोकांना अटक केली. पुरावे गोळा केले. मंदिराचे लुटलेले पैसे जप्त करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही? चांगला डोळ्याचा डॉक्टर असेल तर त्यांना दाखवा. राम मंदिराचे शेकडो कोटी रुपये लुटलेले आहे. गृहमंत्रीपद सांभाळणारा व्यक्ती त्याचं समर्थन करतो, कठिण आहे तुमचं. तुम्ही खरोखरच कारसेवेला गेला होता ना? शंका यायला लागली आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
  • Nepal: चिखलात शोधायचं की पुराच्या पाण्यात? सोनं, चांदी आणि नोटांनी भरलेल्या 20 बँकांच्या तिजोऱ्या गेल्या कुठे? नेपाळी पोलिसांना आलं टेन्शन
  • Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
  • नेपाळनंतर आणखी एका देशात जलप्रलय, पूल गेले वाहून, 20हून अधिक लोक बेपत्ता;
  • निक्की -अरबाजने ब्रेकअपचं नाटक करून चाहत्यांना वेड्यात काढलं, तो Video व्हायरल होतोच चाहते संतापले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in