
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटण्यासाठी सज्ज झाले आहे. जरांगे पाटलांशी चर्चा करण्यापूर्वी प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू असून, अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे.
जरांगे पाटलांनी यापूर्वी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर शासनाने काही माहिती पाठवली होती, ज्यावर जरांगेंच्या प्रतिसादाची वाट पाहिली जात आहे. सरकारी सूत्रांनुसार, सरकारने काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत आणि त्यावर जरांगेंची भूमिका काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. संभाजीनगर येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली जात आहे. ही चर्चा केवळ चर्चेतूनच सुटणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मंत्री विखे पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगेंच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच, जरांगे पाटलांना अद्याप कोणताही मसुदा पाठवलेला नसून, यापूर्वी घेण्यात आलेले निर्णय कळवण्यात आले आहेत. विखे पाटील, देसाई, सामंत आणि लाड हे नेते जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत.
Leave a Reply