
अजित पवारांच्या अपघातावर बोलताना सुनेत्रा पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. “माझी मुलं आणि माझ्यापेक्षा दादांच्या जाण्याचं दुःख कुणाला जास्त असणार,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये, असे आवाहन करत त्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर टीका केली.
यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात दाखल न झालेल्या एफआयआरबद्दल केलेल्या टीकेचा संदर्भ दिला. एका फोटोसाठी अमित ठाकरेंवर एफआयआर होतो, पण उपमुख्यमंत्र्यांच्या अपघातावर सरकारकडून एफआयआर नाही, या सुप्रिया सुळेंच्या विधानावर त्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे चाळीस आमदार आणि आठ ते नऊ मंत्री असले तरी कोणीही दादांच्या अपघाताच्या चौकशीबद्दल बोलले नाही, या सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले. सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट घेतली आहे. तपास यंत्रणा आपले काम करत असून, त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. सतत माध्यमांसमोर येऊनच माहिती मिळते असे नाही आणि वारंवार अशा गोष्टींमुळे केवळ मीडिया ट्रायल होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Leave a Reply