
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडनमधील भाषणावरून आणि त्यांच्या वडापाव खातानाच्या व्हिडिओवरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था असे अनेक गंभीर प्रश्न असताना, उपमुख्यमंत्र्यांचा लंडन दौरा किती योग्य आहे, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी पाण्याअभावी त्रस्त आहेत, त्यांना प्यायला पाणीही मिळत नाही, तर सरकार बिल्डर आणि कॉर्पोरेट धार्जिणे बनले आहे.
लंडनमध्ये पुरस्कार स्वीकारणे किंवा वडापाव खाण्याचे फोटो काढणे, याचा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला काहीही फरक पडत नाही. सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, गुरांच्या छावण्या सुरू कराव्यात आणि मुलांची शिक्षण फी माफ करावी, अशी मागणी राऊत यांनी केली. मुंबई-गोवा महामार्गाची आजही दुरवस्था आहे आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले. सरकार जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Leave a Reply