• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

July 18, 2026 by admin Leave a Comment


ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस होता. पहाटेच पोलिस जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांनी तातडीने वांगचुक यांना उचलून रुग्णालयात उपचारासाठी नेले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला. तर आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी आमरण उपोषणाची घोषणा केली. या सर्व घडामोडींवर अभिजितच्या आई-वडिलांनी (Bhagwanrao Dipke- Anita Dipke reaction) समोर येत मोठी प्रतिक्रिया दिली.

सरकार दखल घेत नाही

NEET परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी अभिजीत लढा देत आहे. त्याच्या नातेवाईक अथवा नात्यातील भावा-बहि‍णींसाठी तो लढत नाही. तो सर्वांसाठी लढा देत आहे. पण सरकार या आंदोलनाची कुठलीच दखल घेत नसल्याचा आरोप अभिजितची आई अनिता दीपके यांनी केला. तो धडपड करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो लढा देत आहे. 6 जून रोजी तो अर्धा तास तो घरी आला. सोनम वांगचुक यांना सरकारने उचलून नेले, हे चुकीचे केले आहे. सरकारला एकच सांगणे आहे की, मुलांचे म्हणणे ऐकून घ्या. त्याचे वडील दवाखान्यात दाखल होते, गेल्या शनिवारी अभिजीतशी बोलणे झाले. अशात त्याच्याशी बोललो नसल्याचे आईने सांगितले.

आमचा जीव कसा लागणार?

अभिजीत आमरण उपोषणाला बसला आहे, आमचा जीव कसा लागणार? असे म्हणत त्याच्या आईचा कंठ दाटून आला. आज सोनम वांगचुक यांना नेले. उद्या त्यालाही असेच उचलून नेले तर आम्ही काय करणार? वांगचुक यांना सकाळीच झोपेतून उचलून नेले. उद्या अभिजीतबाबत असेच झाले तर आम्ही काय आणि कुणाकडं न्याय मागणार असा सवाल अभिजीतची आई अनिता दीपके यांनी विचारला. त्यांनी मुलाविषयी मोठी चिंता व्यक्त केली.

ही तर हुकुमशाही झाली ना

ते लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. तिथे कुठलीही हिंसा झाली नाही. जनता त्यांच्या बाजूने होती. दिल्ली आणि देशातील अनेक जण दिल्लीत त्यांची काळजी घेत होता. सरकारने सोनम वांगचुक यांना अशा प्रकारे अचानक उचलून न्यायची गरज नव्हती. सरकारने प्रतिनिधी पाठवून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. ही तर हुकुमशाही झाली ना. वांगचुक हे मोठे वैज्ञानिक आहे. त्यांनी देशाचा विचार करून उपोषणाला बसले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पाठिंबा दिला. वांगचुक यांना उचलून नेले म्हणजे हे आंदोलन संपून जाईल असे सरकारला वाटत होते. सरकारला हे आंदोलन मोडून काढायचे आहे. त्याला अमेरिकेत चांगली नोकरी मिळत होती. मी ही त्याला सांगितलं होतं की भारतात गढूळ वातावरण झालेले आहे, इकडे येऊ नको. राम मंदिर सोडलं नाही तर इतर माणसांची काय चिंता आहे या देशात? पण त्याने ऐकले नाही, असे अभिजीतचे वडील भगवानराव दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सरकारच्या भूमिकेवर परखड मत व्यक्त केले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; पाऊण तास उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात नेमकं काय होतं?
  • Nepal Flood: चीन तिथे पोहोचला जिथून महाप्रलय सुरू झाला, नेमकं काय घडलं?
  • Khawdya Dongar: कुणालची फक्त एकच मागणी होती, पण मुरलीकाका… अखेर बहिणीने बोलून दाखवलं माहित नसलेले सत्य
  • Nepal Floods : नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO, सद्गुरुंचे 77 अनुयायी कुठे?
  • झोप उडवणारी बातमी… नेपाळमध्ये पुन्हा महाजलप्रलय? 47 हिमनद्या वितळण्याचा धोका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in