
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. दरम्यान पहिले पाच दिवस त्यांनी पाण्याचा एक थेंबही न घेता उपोषण केलं, त्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीमध्ये येऊन भेट घेतली, सरकारला त्यांच्या सर्व अटी मान्य आहेत, असं अश्वासन लाड यांनी दिलं. प्रसाद लाड यांच्या अश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिलं, परंतु उपोषण सोडण्यास नकार दिला आहे, आधी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपला सुरुवात करा, मग उपोषणाचं बघू असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच ओबीसींच्या नावावर कुणीही राजकारण करू नका असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अक्कलदाढ पडल्यावर पुन्हा उगवत नाही, ती आता म्हतारपणात पडली आहे. छगन भुजबळ सत्ता असेल तिकडे जातात. त्यांना आता किंमत देण्याची गरज नाही. ओबीसी समाज आता हुशार झाला आहे, त्यांना पण माहिती आहे की कोण काय काय करतं? आणि आपला कसा उपयोग करून घेतात. भुजबळ कधी महविकास आघाडीचे असतात तर कधी महायुतीचे उतरती कळा लागली ना असंच होतं. त्यांना आता उतरली कळा लागली आहे, असा हल्लाबोल यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस
दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. पहिले पाच दिवस तर त्यांनी पाणीही न पिता उपोषण केलं, त्यानंतर अखेर सरकारकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली आहेत, मात्र अजूनही त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं नाहीये.
Leave a Reply