• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video : बॅटमध्ये AI चिप असल्याचा आरोप, वैभव सूर्यवंशीने एका वाक्यात संपवला विषय

April 29, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींचा नजरा टीव्ही, मोबाईलवर लागलेल्या असतात. कारण वैभव सूर्यवंशीचा आक्रमक बाणा सर्वांनाच माहिती झाला आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेण्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी तरबेज आहे. त्याने मागच्या काही सामन्यात स्फोटक फलंदाजी करून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच दिग्गज गोलंदाजांना घाम फोडला आहे. जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड या दिग्गज गोलंदाजांना त्याने दिवसा तारे दाखवले आहेत. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचं नाव क्रीडाविश्वात चर्चेत आहे. इतकंच काय तर विदेशातही त्याच्या नावाची चर्चा आहे. शेजारी असलेल्या शत्रू राष्ट्रातही त्याच्या नावाने बोंब मारली जात आहे. पाकिस्तानात तर वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये एआय चिप लावून खेळत असल्याचं बोललं जात आहे. त्या चर्चा ऐकून भारतात त्यांचं हासं होत आहे. आता वैभव सूर्यवंशीने एआय चिपवर आपलं उत्तर दिलं ाहे.

पाकिस्तानात क्रिकेट जाणकारांनी काहीही विधानं करण्यास सुरूवात केली आहे. क्रिकेट तज्ज्ञांचं म्हणणं ऐकून हसावं की रडावं असा प्रश्न आहे. त्याने सांगितलं की, हा तरूण फलंदाज बॅटमध्ये एआय चिप लावून तर खेळत नाही ना, कारण तो कोणत्याही मोठ्या गोलंदाजाला सोडत नाही. पाकिस्तानातील अशी विचित्र विधानं भारतीयांना काही नवीन नाहीत. पाकिस्तानचा हा इतिहास भारतीय क्रीडाप्रेमींना चांगलाच माहिती आहे. पण पाकिस्तानातून हे वक्तव्य मस्करीत आणि वैभवची स्तुती करण्यासाठी करण्यात आलं होतं. ही बाब आता वैभवपर्यंत पोहोचली असून त्याने त्याचं मजेशीर उत्तर दिलं आहे. पंजाब किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याला हा प्रश्न विचारला. तेव्हा वैभव म्हणाला की, ‘देवाने लावून दिली आहे. त्याने वरच सांगितलं होतं की तुझ्या बॅटमध्ये काही लावून देत आहे. त्याचाच वापर करत आहे.’

𝘉𝘢𝘵 𝘱𝘦 𝘈𝘐 𝘤𝘩𝘪𝘱 𝘩𝘢𝘪 𝘬𝘺𝘢 𝘵𝘶𝘮𝘩𝘢𝘳𝘦?

Vaibhav answers 😂💗 pic.twitter.com/uZcqABbaGS

— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2026

वैभव सूर्यवंशीने आयपीएल स्पर्धेतील 9 सामन्यात बॅटिंग केली. फक्त एका सामन्यात त्याला खातं खोलता आलं नाही. पण उर्वरित 8 सामन्यात त्याने 400 धावांचा पल्ला गाठला आहे. यात त्याने 1 शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली आहेत. त्याने 44.44 च्या सरासरीने आणि 238 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. इतकंच काय तर षटकारांच्या यादीतही अव्वल स्थान गाठलं आहे. त्याने या स्पर्धेत एकूण 37 षटकार मारले आहेत. तर 34 चौकारांची नोंद केली आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs SRH Toss : मुंबईने टॉस जिंकला, पलटणची बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध रोहित खेळणार? पाहा प्लेइंग 11
  • MI vs SRH: नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला, पण हार्दिक पांड्याने ट्रेंड बदलत घेतला असा निर्णय
  • West Bangal Election | पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार? उलटफेर होणार का?
  • Baramati By Elections Exit Polls : बारामती पोटनिवडणुकीत चमत्कार? सुनेत्रा पवार यांचा विजय होणार का? थक्क करणारा एक्झिट पोल समोर!
  • ना मोबाईल, ना सोशल मीडिया… रेल्वे स्थानकावर झोपलेल्या 150 मजुरांमधून शोधला आरोपी, एका खूनाचा असा झाला रहस्यमयी उलगडा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in