
अनेकांसोबत असं घडतं की, ते लोक प्रचंड मेहनत करतात. दिवसरात्र कष्ट करतात. खूप धन कमावतात. परंतु त्यांच्या हातात पैसे टिकत नाहीत. महिन्याच्या शेवटी बँक अकाऊंट रिकामे असते. त्यामागे विविध कारणे असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील तुमच्या घरात ही समस्या निर्माण होते. तुमच्या घरात पैसा टिकत नाही. घरात पैसा टिकण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.
घराची उत्तर दिशा – तुमच्या घराची उत्तर दिशा ही सर्वात महत्त्वाची असते, या दिशेला धनाची दिशा देखील म्हटलं जातं. त्यामुळे या दिशेला जर काही वास्तुदोष असेल तर त्यामुळे धन प्राप्तीमध्ये अडचणी निर्माण होतात. या दिशेचा दोष दूर करणं गरजेचं असतं. तसेच ही दिशा धनाची देवता कुबेर यांची देखील आवडती दिशा आहे. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला नेहमी कुबेरांचा फोटो लावावा, तसेच उत्तर दिशेला कोणत्याही प्रकारची अडचण असू नये, रद्दी किंवा अवजड सामान ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
घरात लक्ष्मी मातेचा फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी लक्ष्मी मातेचा फोटो असावा. लक्ष्मी मातेची दररोज पूजा ही झालीच पाहिजे, तसेच लक्ष्मीमातेला दररोज एक लाल फूल किंवा झेंडूचं फूल अर्पण करावं, यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतात.
संधैव मिठाचा उपाय – वास्तुशास्त्रामध्ये संधैव मिठाला प्रचंड महत्त्व आहे. दररोज सकाळी संधैव मीठ मिश्रीत पाण्याने घराचा उंबरा हा पुसून घ्यावा, त्यामुळे घराला बरकत प्राप्त होते, सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply