• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi: कोपऱ्यात बसून एकटाच ढसाढसा रडला, कोणी पाहिलंही नाही, टीम इंडियाने वैभवला एकटं पाडलं? Video Viral

July 12, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सर्व सामने भारतीय संघाने गमावले. एकही टी-20 सामना भारतीय संघाला जिंकता आलेला नाही ही सर्वात मोठी खेद आहे. भारतीय संघावर मोठी नामुष्की ओढवली, शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने मोठा बदल केला. वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवलं आणि संजू सॅमसनला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले. पण त्याचाही काही विशेष परिणाम झाला नाही. संघाने मालिका गमावलीच. मालिका गमावल्यानंतर सगळ्यांना जितके दु:ख झाले नाही तितके दु:ख वैभव सूर्यवंशीला झाले. व्हायरल व्हिडिओमधून तो किती दु:खी आहे ते समजेल.

संघातून वगळल्यानंतर वैभव सूर्यवंशी स्वतः निराश झालेला दिसला. सामन्यादरम्यान वैभव डगआऊटमध्ये उतरलेल्या चेहऱ्याने बसलेला दिसला, पण पाचव्या टी-20 सामन्यात भारतीय संघाच्या पराभवानंतर तो रडू लागला. सामन्यानंतर सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते, पण वैभव धक्क्यात होता आणि स्वतःला सावरू शकला नाही. वैभवचा हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वैभवचा स्वत:च्या इमोशनवर ताबा नाही. त्याला पटकन  रडू कोसळते. आयपीएलमध्ये राजस्थानचा संघ जेव्हा जेव्हा पराभूत झाला वैभवला रडू कोसळायचे. त्यामुळे वैभव खूप हळवा असल्याचे समजते.

Vaibhav Suryavanshi in tears after being dropped 😢
India’s management is destroying a generational talent. This isn’t handling, it’s breaking his confidence. Protect the kid. #ENGVIND pic.twitter.com/esHXyRxzeg

— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) July 11, 2026

इंग्लंड दौऱ्यावरील टी-20 मालिकेत टीम इंडियाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. भारतीय संघ मालिका 4-0 ने हरला. पावसामुळे एक सामना रद्द करण्यात आला. अंतिम टी20 सामन्यात इंग्लंडकडून जोस बटलर आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. बटलरने 64 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 8 षटकारांसह 131 धावांची स्फोटक खेळी केली.

बटलरसोबतच ब्रूकनेही भारतीय गोलंदाजांना झोडपले. हॅरी ब्रूक 45 चेंडूंमध्ये 95 धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने 8 षटकार आणि 4 चौकार मारले, ज्यामुळे यजमान संघाला 20 षटकांत 3 गडी गमावून 257 धावांचा डोंगर उभा करता आला. प्रत्युत्तरात, भारतीय संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 201 धावाच करू शकला आणि 56 धावांनी सामना गमावला. भारतीय संघाकडून इशान किशनने 56 धावा, तर तिलक वर्माने 53 धावा केल्या.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..
  • शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर
  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in