• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या धडक कारवायांची बॉलिवूडमध्येही चर्चा; मनोज वाजपेयी झाले फॅन

September 4, 2026 by admin Leave a Comment


Manoj Bajpayee Statement : महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) हे त्यांच्या धडाधड कारवायांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांनी एफडीएची सूत्र हातात घेतल्यावर राज्यभरात कारवाया सुरू केल्या, त्यामुळे भेसळखोराचं धाबं दणाणलं. त्यांच्या बेधडक अंदाजाची, स्पष्टवक्तेपणाची आणि कारवायांची सध्या बरीच चर्चा असून आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही त्यांचा हा अंदाज आवडताना दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनीही तुकाराम मुंढे यांची काम करण्याची पद्धत आणि कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा, त्यांचं समर्पण याचं कौतुक केलं. आजच्या काळात जर एखादी व्यक्ती अतिशय प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन काम करत असेल, तर लोकांना तीच गोष्ट अद्भुत वाटते आणि ती व्यक्ती चर्चेत येते.

प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती सेलिब्रिटी बनते

ANI शी संवाद साधताना अभिनेता मनोज वाजपेयी यांनी समाजातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य करताना प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची किंवा तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याची विशिष्ट जबाबदारीसाठी नियुक्ती केली जाते. मात्र, जेव्हा एखादा अधिकारी कोणत्याही अपेक्षेशिवाय पूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पणाने आपले कर्तव्य बजावत असतो, तेव्हा त्याचीच लोकांमध्ये चर्चा होऊ लागते, असं ते म्हणाले. एखादा अधिकारी आपल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहून काम करताना दिसला की लोकांना त्याचं कौतुक वाटते. त्यातून संबंधित अधिकारी सोशल मीडियावरही चर्चेत येतो आणि काही वेळातच त्याचा व्हिडिओ किंवा काम व्हायरल होतं.

याच मुद्द्यावर मनोज वाजपेयी पुढे म्हणाले, ‘ याचा सरळ अर्थ असा आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण प्रामाणिकपणे आपले काम करते, तेव्हा ती सेलिब्रिटी बनते.’ मात्र समाजाच्या सध्याच्या परिस्थितीशी या गोष्टीचा संबंध जोडताना मनोज वायपेयी यांनी एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित केला. एखाद्या व्यक्तीने केवळ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले म्हणून ती प्रसिद्ध होते, ही बाबच खरं तर विचार करण्यासारखी आहे, असं त्यांनी म्हटलं. आपल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहणे ही सामान्य आणि

फूड सेफ्टीबाबत तुकाराम मुंढे यांची कठोर भूमिका

हाराष्ट्राच्या अन्नसुरक्षा विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी म अन्नसुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर भूमिका घेतली. जिथे सुरक्षा नियमांचे उल्लंघन झालेलं आढळून येतं, एफडीएकडून अशा खाद्य व्यवसायांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून एफडीएने अनेक ठिकाणी धाड टाकून, अनेक आस्थापनं, हॉटेल्स, रेस्टॉरंटवर कारवाई केली, प्रसंगी काहीचे परवानेही निलंबित केले. त्यांच्या या धडक कारवायाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होते.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…
  • राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
  • Photographer Murder Case : त्याचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू, तरी गर्लफ्रेंडसोबत सुरू होती रोमँटिक चाटिंग, सत्य समोर येताच पोलीसही हादरले; काय घडलं?
  • Salman Khan : कॅमेरा समोर येण्याची गरजच नाही…सलमान खानचा पारा चढला ! नक्की काय घडलं?; VIDEO व्हायरल
  • Who is Ayushi Shekhawat : क्रिकेटच्या मैदानात सौंदर्य अवतरलं, ती लावण्यवती नेमकी कोण; फोटो तुफान चर्चा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in