
नीट पेपरफुटी प्रकरण आंदोलनामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे तीन युवक चांगलेच चर्चेत आले आहेत. अभिजीत दीपके, सौरव दास, आशुतोष रांका अशी तिघांचे नावे आहेत.
अभिजीत दीपके याच्यानंतर आता सौरव दास देखील तितका चर्चेत आला आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका या दोघांनी सरकारच्या मंत्र्यांशी भेटताना कॉक्रोच जनता पार्टीचं प्रतिनिधित्व केलं होतं. कॉक्रोच जनता पार्टीच्या सौरव दासवर अनेक तरुणी फिदा झाल्या आहेत.
सौरव दासने पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं. पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने माहितीचा अधिकार कायद्यांअंतर्गत सरकारचे अनेक गैरव्यवहार उघडकीस आणले. त्याने अवघ्या वयाच्या 18 व्या वर्षी या कायद्याचा वापर करण्यास सुरुवात केली होती.
सौरव दासने लोकांमध्ये सुरुवातीला आयटीआय कार्यकर्ता म्हणून ओळखू लागला होता. त्याने कोरोना काळातील गैरव्यवहाराच्या विरोधात हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर सरकारला कारवाई देखील करावी लागली होती.
सौरवने 2020 साली स्वतंत्र शोध पत्रकारिता सुरू केली. त्याने कायदा, न्यायपालिका, प्रशासन, गुन्हेगारी इत्यादी विषयांवर सातत्याने रिपोर्टिंग केली आहे. अनेक लेख लिहिले आहेत.
सौरव दास हा सध्या 'द कोर्ट्स रोल इन इंडियाज क्वाएट सफरिंग' नावाच्या पुस्तकावरही काम करत आहे. या पुस्तकात त्याने भारतीय न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रकरणावर विश्लेषण केलं आहे.





Leave a Reply