
रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम फेरीत धडक दिली आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवून फायनलचं तिकीट मिळवलं. आरसीबीने कॅप्टन रजत पाटीदार याने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये 255 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना गुजरातला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. आरसीबीने गुजरातला 162 धावांवर 19.3 ओव्हरमध्ये गुंडाळलं. आरसीबीची यासह अंतिम फेरीत पोहचण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. तर पराभवानंतरही गुजरातला अंतिम फेरीत पोहचण्याची संधी मिळणार आहे. गुजरातला क्वालिफायर 2 सामन्यात एलिमिनेटरमधील विजेत्या संघासह 2 हात करणार आहे.
Leave a Reply