
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका करत या विधेयकाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, 2023 मध्ये हे विधेयक मंजूर झाले असले तरी त्यामागे वेगळाच राजकीय अजेंडा असल्याचा संशय आहे.
राहुल गांधी यांच्या मते, या निर्णयामुळे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वावर परिणाम होऊ शकतो. त्यांनी आरोप केला की, सरकार आधी काही राज्यांमध्ये असे प्रयोग करून पाहिले असून आता तेच मॉडेल देशभर राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली सत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले असून येत्या काळात संसदेत या विषयावर अधिक वाद होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply