
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून प्रहार केला. रचनात्मक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण, चीनचे भारतीय हद्दीतील अतिक्रमण आणि इतर अनेक मुद्यांवरून सरकारला चांगले घेरले. दिल्लीतील या अधिवेशनात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर कडाडून प्रहार केला. त्यांच्या वक्तव्यामुळे वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.
भारताला इंदिरा गांधी सारख्या नेत्याची गरज
जर भारताने त्याची ताकद ओळखली असती. इंदिरा गांधी सारखा भारताचा नेता असता. तर भारतासाठी सर्वात मोठी संधी होती. इराण आपला जुना मित्र, अमेरिका आपला जुना मित्र, रशियाही आपला मित्र. या तिघांमध्ये मैत्री वाढवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावली असती. पण झालं काय? आपली संधी पाकिस्तानने पळवली. पाकिस्तान मध्यस्थ झाला. मोदी हे बघतच राहिले. आता काय झाले. माध्यमं हे काही सांगत नाही. मला तर आता मोदींच्या कार्यालयातून माहिती मिळते, असा टोला त्यांनी लगावला.
मोदी-शाह-राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा
भारताच्या सीमेत अरुणाचल प्रदेशात चीनने आपल्याला पेट्रोलिंग करण्यास मनाई केली. तुमची जमीन आहे हे ठीक आहे, पण तुम्ही इथं पेट्रोलिंग करू शकत नाही. राजनाथ सिंह, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची हवा निघाली आहे. ते काय करत आहेत. ऑपरेशन सध्या सुरू आहे. ही बातमी दाबण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. कोणताही विचार न करता हे देशाचं नुकसान करत आहे. मी पाहिलं. गलवाणनंतर पंतप्रधान झूम कॉलवर आले. मोदी म्हणाले की भारताची एक इंचही जागा चीनने घेतली नाही. त्यानंतर आर्मी म्हणते की देशाची जमीन तर घेऊन गेले. तुम्ही विचार करा. चीनला संदेश काय गेला? चीनच्या मध्यस्थाने भारताच्या मध्यस्थला सांगितले की, तुमच्या पंतप्रधानांनी दावा केला आहे की तुमची जमीन आम्ही घेतलेली नाही. यांनी आतून देश संपवला आहे. परराष्ट्र धोरण गुंडाळलं आहे आणि सर्वच काम पक्षाचे स्ट्रक्चर उभे करण्यासाठी, अदानींना फायनान्स करण्यासाठी त्यांनी वापरले, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.
बातमी अपडेट होत आहे….
Leave a Reply