
नाशिकच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या पावसाने गोदाकाठावरील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलं असून दुतोंड्या मारुतीच्या छातीच्यावर पुराचं पाणी पोहोचलं आहे.
विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. एवढंच नाही तर, उपमहापौर विलास शिंदे यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. सायंकाळपर्यंत 25 ते 30 हजार क्युसेक इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रता होणार पाण्याचा विसर्ग होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सध्या 13 हजार क्युसेक इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. एवढंच नाही तर, नाशिकच्या रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली..
गोदावरीच्या पुराने बाजारपेठात शिरले पुराचं पाणी शिरलं आहे.. गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात बारा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा केला जात आहे तर संध्याकाळपर्यंत एकोणवीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रात केला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या टपऱ्यांमध्ये पुराचं पाणी भरलं असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे तर रामसेतू पूलही पाण्याखाली गेल्याने गोदाकाठाचे जनजीवन हे काहीसे विस्कळीत झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.




Leave a Reply