
अंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असतानाच आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा निघणार आहे. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून ओबीसींना मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात असून ते संपून जाण्याची भिती आहे. म्हणून लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाची हाक देण्यात आली आहे. कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्या समाजाला आरक्षण देणार नाही ही सरकारची भूमिका आहे. सरकारने तसं अनेकदा सांगितलं देखील आहे. कुणबी समाज हा ओबीसीमध्ये येतो. ज्या मराठ्यांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. ती सरकारने मान्य देखील केली आहे. पण जात पडताळणीत काही नोंदी रद्द झाल्या आहेत. यावर मनोज जरांगेंचा आक्षेप आहे. त्यासाठी त्यांचं आमरण उपोषण सुरु आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड-पाटस येथील टोल नाक्यावरुन हा ओबीसी आक्रोश मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply