
नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे 600 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप शेकडो लोक गायब आहेत. या महापुराचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अचानक आलेल्या या महापुराने नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याच महाप्रलयामध्ये भारतातील, महाराष्ट्रातील काही पर्यटकही अडकले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या लोकांना आपल्या मायदेशी आणण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. दरम्यान, याच महापुराबाबत एक धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इन्फोसीसचे पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ गोपीशेट्टी या महापुरानंतर गायब झाले आहेत. त्यांचा पत्ता मिळत नाहीये.
Leave a Reply