
Nepal Flash Flood: नेपाळवर एक मोठं संकट आलं आणि होत्याचं नव्हतं करुन गेलं… यामध्ये कित्येक बेपत्ता आहेत, तर अनेकांचा मृत्यू झालाय. पण नातेवाईकांना आपला माणून जिवंत आहे की, त्याचा मृत्यू झाला आहे… काहीही माहिती नाही. काठमांडू येथील त्रिभुवन विश्वाविद्यालय शिक्षण रुग्णालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या महिलेने तेथील पत्रकारांना एक प्रश्न विचारला, जो मन सुन्न करणारा होता… ‘तुमचे कॅमेरे आमच्या लोकांना परत आणू शकतील का?’ महिलाच्या या प्रश्नानंतर तेथील वातावरण काही वेळासाठी गंभीर झालं. त्यांच्या हातात बेपत्ता नातेवाईकांचे फोटो आहे आणि डोळ्यात परतण्याच्या आशा आहे… तेथील लोक आता म्हणत आहेत ती, आशे शिवाय आता बाकी काहीच उरलेलं नाही.
‘नेपाळी टाईम्स’च्या रिपोर्टनुसार, दिल कुमारी मसरांगी मगर रुग्णालाच्या गेटवर तिचा बेपत्ता मेहुणा आणि भांच्याचे फोटो लावत आहे… तिच्या भोवती मृतांचे फोटो आणि आतापर्यंत बेपत्ता झालेल्या लोकांची मोठी यादी आहे. महिला पत्रकारांना तिची स्थिती सांगत आहे.
महिला म्हणते, ‘आशा आणि प्रतिक्षेशिवाय आता काहीही बाकी राहिलेलं नाही. जर जिवंत भेटत नसतील तर, त्यांचे मृतदेह तरी भेटावे… कमीतकमी हे तरी कळेल की, ते कुठे आहे.’ ही फक्त दिल कुमारी हिची स्थिती नाही. रुग्णालयाच्या बाहेर आपल्या माणसांच्या शोधात नातेवाईकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कोणी फोटो घेऊन पोहोचले आहेत, तर कोणी कोणता पुरावा घेऊल रुग्णालयाच्या बाहेर आहे… कोणी भावाच्या, तर कोणी बहिणीच्या, नवऱ्याच्या, वडिलांच्या, आईच्या शोधात आहेत.
धक्कादायक सत्य म्हणजे, अनेक कुटुंबियांचं शोधकार्य फक्त एका रुग्णालयापर्यंत मर्यादित राहिलेलं नाही. सोनिया केसी नावाची महिला, भाऊ शिवराम याच्या शोधात तीन दिवसांपासून काठमांडू येथील वेगवेगळ्या रुग्णालयात पोहोचत आहे. तर चितवन येथे राहण्याऱ्या लोकांना नातेवाईकांचा शोध नारायणी नदीकिनारी घेण्यास सांगितलं आहे… सोनिया म्हणते, जोपर्यंत भाऊ भेटत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रतिक्षेत राहिल.. सांगायचं झालं, सोशल मीडियावर देखील घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Leave a Reply