
नाशिक टीसीएस प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. मानसिक, लैंगिक छळ, धर्मांतर असे सगळे प्रकार कंपनीत चालत असल्याचं समोर आलय. महत्वाचं म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही देशातील अग्रग्ण्य आयटी कंपनी आहे. तिथे असे प्रकार चालत असल्याचं समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आता कंपनीतील काही महिला कर्मचारी पुढे येऊन बोलत आहेत. त्यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे. नाशिक टीसीएसमध्ये टीम लीडर त्यांच्या डेस्कचा वापर कामासाठी नव्हे तर महिला कर्मचाऱ्यांना मानसिक आणि नैतिक मुल्यांवरुन त्रास देण्यासाठी वापरायचे. टीम लीडर जेव्हा बोलवायचे तेव्हा ते महिलांसोबत अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलायचे असं एका कर्मचाऱ्याने सांगितलं.
“सर्व आरोपींची खासकरुन त्यांची बोलण्याची पद्धत अत्यंत घाणेरडी होती. मुलींना टीम लीडरच्या डेस्कवर बोलवायचे व तिथे अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलायचे. कुठल्याही व्यावसायिक कार्यालयात अशा पद्धतीने बोललं जात नाही” असं एका माजी कर्मचाऱ्याने सांगितलं. एका माजी महिला कर्मचाऱ्याने दोन स्टाफ मेंबरची नाव सांगितली. “दानिश आणि रझा. ते ऑफिसमधूनच वीकेंडसाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट बुक करायचे आणि तिथे येण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकायचे. तिथलं वातावरण खूपच विषारी होतं. कंपनी सोडल्यानंतर आता बरं वाटतय” असं तिने सांगितलं.
सिनियर मॅनेजमेंटला याची कल्पना नव्हती का?
एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑर्गनायजेशनमध्ये सिनियर मॅनेजमेंटला याची कल्पना नव्हती का? इथे काय चाललय? असा सवाल तिने उपस्थित केला. एकूण आठ महिला कर्मचाऱ्यांनी याची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं. तपासाठी विशेष तपास पथक SIT ची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाच एचआर निदा खानचा सुद्धा रोल महत्वाचा आहे. तिच्याकडे तक्रारी करुन देखील तिने दखल घेतली नाही असं कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या ही निदा खान फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. तिने हे सर्व विषय कसे हाताळले? हे पोलिसांना जाणून घ्यायचं आहे.
Leave a Reply