
महाराष्ट्रात गणेशोत्सवात डीजे वाजवण्याचा मुद्दा तापत चालला आहे. त्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. काल विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण झाली. त्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बापटांना झालेल्या मारहाणीनंतर पुण्यात रविवारी डीजे बंदीसाठी मोर्चा निघणार आहे. सोलापुरात पोलिसांनी डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा झाला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. पण नागपूरात मात्र भाजप नेत्याने वेगळी भूमिका घेतली आहे. नागपूर भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी आम्ही डीजे वाजवणारचं असं म्हटलं आहे. श्रीकृष्णाप्रमाणेच अन्यायाविरोधात लढा असं दयाशंकर तिवारी म्हणाले.
“संपूर्ण महाराष्ट्रात कायदा एकसारखा असला पाहिजे. मुंबई, पुणे, नागपूरला वेगळा कायदा असं नको. यापूर्वीही नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त मुद्दाम गणेशोत्सव, दुर्गोत्सव आणि आता कृष्ण जन्माष्टमी यावेळी डीजेवर बंदी घालतात” असं दयाशंकर तिवारी म्हणाले. तुम्हाला भाजपमध्ये अंतर्गत मतभेद वाटत नाहीत का? “कोणाचा वयैक्तीक विचार सामाजिक विषयावर असणं अपेक्षित आहे. संदीप जोशींचा जो विचार आहे, तो व्यक्तिगत विचार आहे. भाजपचा विचार नाही. मुंबईत डीजे आहे, पुण्यात डीजे आहे, महाराष्ट्रात डीजे आहे, मग नागपुरात का नाही?” असा प्रश्न दयाशंकर तिवारी यांनी विचारला.
तुम्ही कोर्टात जाणार का?
तुम्ही कोर्टात जाणार का? “थेट कोर्टात जाणार नाही. पोलीस आयुक्तांसोबत आधी बोलणार. कारण त्यांनी आदेश काढलाय. ज्यांनी निर्णय काढलाय, त्यांच्याशी आधी बोललं पाहिजे. काही नाही झालं तर मग पुढे जाऊ” असं दयाशंकर तिवारी स्पष्टपणे बोलले. “आम्ही डीजे वाजवणारचं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर तो स्वीकारणार. डीजे वाजवण्यात काही अडचण नाही. फक्त मर्यादीत आवाजात वाजला पाहिजे” असं दयाशंकर तिवारी म्हणाले.
Leave a Reply