
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सध्याच्या परिस्थितीवर नाराजी दर्शवली आहे. आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, समाजाला फसविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, महसूल विभागाने 52 कुळांना अधिकृतपणे 22 लाख प्रमाणपत्रे दिली असल्याचा दावा असतानाही, काहीजण ही आकडेवारी कमी करून दाखवत आहेत. यामुळे समाजात संभ्रम निर्माण होत असून, आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यास दिरंगाई होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जरांगे पाटील यांनी काही राजकीय नेत्यांच्या भूमिकेवरही कडाडून टीका केली. मराठा आरक्षणासारख्या गंभीर विषयावर केवळ दिखावा केला जात असून, प्रत्यक्ष कृती होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी, “किती येड्यात काढणार आहात लोकांना तुम्ही?” असा संतप्त सवाल विचारत, समाजाला एकत्र येऊन या संघर्षात सामील होण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सुटावा यासाठी त्यांनी अंतरवाली सराटी येथे जमण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply