
मनोज जरांगे पाटील यांचे मन वळवण्याच्या प्रयत्नांना सरकारी शिष्टमंडळाला यश आले नसल्याचे दिसले. आज लगबगीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराज देसाई, आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी गाठली. पाटलांशी दोन तास चर्चा केली. त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्याचेही मान्य केले. त्यांच्यावर कडक कारवाईचे आश्वासन दिले. या इतक्या गुळपिठानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी गुढी दिली नाही. त्यांनी सरकारला धडकी भरवणारी घोषणा केली. पाटील 29 ऑगस्ट रोजीच्या आंदोलनावर ठाम आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचे पाच प्रश्न
मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर शिष्टमंडळाशी चर्चा करताना मनोज जरांगे पाटील यांनी पाच प्रश्न विचारले. आपल्या मागण्या संदर्भात त्यांनी चर्चा केली आहे, आपल्या मागण्या आपण सांगितले आहेत.
1) आठवण लाख कुणबी नदी तुम्ही शोधले आहेत त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या, यापूर्वी जे प्रमाणपत्र दिले आहेत त्याचा डाटा द्या आणि इथून पुढे राहिलेले द्या.
2) ज्या बांधवांनी व्हॅलेडीटी साठी अर्ज केले ते जाणीवपूर्वक रोखून ठेवलेत.
3) सातारा, हैदराबादचा जीआर काढला तो खरा काढला की खोटा काढला असं विचारलं.
4) त्यांनी जीआर काढला होता मराठ्यांना ओबीसी सवलती त्या सवलती लागू झाल्या नाहीत, ते 28 तारखेच्या आत लागू करा.
5) केसेस वर चर्चा केली त्यांनी काहीतरी सांगितलं तेराशे मागे घेतल्या.
बातमी अपडेट होत आहे…
Leave a Reply