• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mamata Banerjee : … तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईन, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा

August 28, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात भाजपविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याबाबत याबाबत संकेत दिले आहेत. तृणमूल काँग्रेसला दबावाखाली आणता येणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. कितीही गुन्हे दाखल झाले तरी त्याविरोधात आपण लढणार असून, गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरही दाद मागू, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गेल्या काही काळापासून तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये छात्र परिषदेच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमावरून संघर्ष सुरू आहे. कालीघाट तृणमूल काँग्रेसला बिर्ला तारांगणासमोर सभा घेण्याची परवानगी देण्यात आली होती. याच ठिकाणी आज तृणमूल छात्र परिषदेचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या मंचावरून ममता बॅनर्जी यांनी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना आंदोलनाचे आवाहन केले. विद्यार्थी आणि तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे. गरज पडली तर तुरुंगात जा. एक महिना तुरुंगातील अन्न खावे लागले तरी चालेल, पण भाजपचे अन्न खाऊ नका असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

गरज पडली तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईन

आपल्या भाषणात ममता बॅनर्जी यांनी भाजपला थेट इशारा दिला. त्या म्हणाल्या, ‘तुम्ही 14 हजार गुन्हे दाखल केले आहेत? कल्याण बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात लढत आहेत. मीही न्यायालयात जाईन. गरज पडली तर आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाईन. हे लक्षात ठेवा, सरकारही उघडे पडेल आणि अटक करणारेही उघडे पडतील.’ ममता बॅनर्जी यांनी आपण लवकरच विविध जिल्ह्यांचा दौरा सुरू करणार असल्याचेही सांगितले. मात्र, या दौऱ्यांना परवानगी नाकारण्यात आली तर आपण थेट रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.

पोलिसांनी परवानगी दिली नाही तर जनतेकडून परवानगी घेईन

जुलूस आणि सभा आयोजित करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्याच्या मुद्द्यावरही ममता बॅनर्जी यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘हा लोकशाही आंदोलनाचा मुद्दा आहे. मी वारंवार न्यायालयाकडून परवानगी का घ्यावी? न्यायालयात आधीच अनेक प्रकरणे आहेत. तुम्ही न्यायालयाचा वेळ का वाया घालवत आहात? आता पोलिसांनी परवानगी दिली नाही तर मी जनतेकडून परवानगी घेईन, असे त्या म्हणाल्या.

भाजपवर हल्लाबोल

भाजपवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, ‘प्रशासनाने देशद्रोह्यांच्या रॅलीसाठी सकाळी 9 वाजल्यापासून माझ्या घराजवळील सर्व रस्ते बंद केले. मात्र, इथून वाहनांना जाण्याची परवानगी देऊन ते जनतेला त्रास देत आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी प्रशासनावर असेल, असेही त्यांनी म्हटले. रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा करण्यास पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आपल्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांना सहकार्य करावे, अशी सूचना ममता बॅनर्जी यांनी केली.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in