
Maharashtra News LIVE : राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडीत चार मजली इमारत कोसळली आहे. बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आले आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोलीत पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. अमरावतीमधील मेळघाटत पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेला आहे.
लोकसभेनंतर राज्यसभेतही सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. आता नवीन कायद्यानुसार पेपरफुटीप्रकरणात दोषींवर कडक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. राज्यसभेतही काल जोरदार हंगामा झाला. पेपरफुटीत भाजपचे 8 जणांचा समावेश असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. त्यांनी काल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेतली. मोदींनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खर्गे यांनी केली. तर जंतरमंतरवरील आंदोलकांवर कारवाई न करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला.
Leave a Reply