
राज्यात मॉन्सून दाखल झाला. मुंबईसह अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. रात्रभर पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. मुंबई उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. काल संध्याकाळपासून मालाडसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई लोकलवरही या पावसाचा परिणाम झाला. मध्य रेल्वे उशीराने धावत आहे. पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली. त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच त्याचा हत्येचा कट रचला होता. रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 तारखेपासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान विरोध सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत आहेत. केजमधील एका खून प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Leave a Reply