
बोनस बियाणे व खते या संदर्भात सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे. 29 जून 2025 रोजी स्थापन केलेली पाच सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त करण्यात आली आहे. बोगस बियाणांच्या तक्रारी पाहता, पुन्हा एकदा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत संबंधित जागेला भेटी देऊन त्यांची तपासणी करून त्याबाबतचा अंतिम अहवाल सादर करणार आहे. अर्नाळा येथील समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचा शोध अद्यापही सुरूच आहे. भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर, अर्नाळा पोलीस , वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून मागच्या 20 तासांपासून शोधमोहिम सुरू आहे. – नंदुरबार जिल्ह्यात दीड महिना उलटूनही समाधानकारक पाऊस नाही; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजावर पेरणी केली; मात्र पावसाने पुन्हा दडी मारल्याने उगवलेली पिके धोक्यात सापडली आहेत. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेटस या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
Leave a Reply