
नाशिक शहर आणि परिसरात काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा विसर्गही कमी केला. गंगापूर धरणातून सध्या 4 हजार 947 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून 2,600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने गोदावरी आणि दारणा नदीवरील पूर ओसरला आहे. तर शेळगाव मध्यम प्रकल्पात 58.53 टक्के जलसाठा शिल्लक असून गतवर्षाच्या तुलनेत 37% ने पाणी पातळीत वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेळगाव मध्यम प्रकल्प यावल चोपडा अनेक भागात सिंचन उपयोगी महत्त्वाचा आहे. तर बँकेचे व्यवहार करताना सावध राहा, सेवानिवृत्त ओळखपत्रच्या आमिषाने डोंबिवलीतील निवृत्त नौदल अधिकाऱ्याची फसवणूक झाली आहे. ओटीपी घेत 5.98 लाखांवर डल्ला मारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. डोंबिवलीतील नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या 61 वर्षीय महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. तर बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. त्यांनी वाईन शॉपजवळ विकल्या जाणाऱ्या बंदी असलेल्या सिगारेट आणि अमली पदार्थांचा पर्दाफाश केला. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
Leave a Reply