
लवकरच टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. पण त्याआधी वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी आयर्लंड विरुद्ध T20 सीरीज खेळू शकणार नाहीय. BCCI सूत्रांनुसार त्याचं इंग्लंड दौऱ्यावर सुद्धा खेळणं निश्चित नाहीय. क्वाड्रिसेप्स इंजरीमुळे तो दोन्ही सीरीजमधून आऊट होऊ शकतो. नितीश कुमार रेड्डी आयर्लंड सीरीजमधून बाहेर गेला आहे. इंग्लंडमध्ये तो व्हाइट बॉल सीरीज खेळणार की नाही,हे अजून निश्चित नाहीय. नितीशची दोन्ही सीरीजसाठी T20 आणि वनडे संघात निवड झाली होती.
हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत तो भारताचं मुख्य अस्त्र होता. पण आता तो बाहेर गेल्याने टीमच्या चिंता वाढल्या आहेत. दुखापतींमुळे नितीश कुमार रेड्डी मागच्या वर्षभरापासून हैराण आहे. IPL 2025 च्या सीजनमध्ये 13 मॅचमध्ये तो फक्त पाच ओव्हर टाकू शकला. गुडघे दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेतून मध्यावरच त्याला माघार घ्यावी लागलेली.
त्या मॅचमध्ये त्याने बॅटिंग केली नव्हती
अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरीजमध्ये नितीश रेड्डीला क्वाड्रिसेप्स इंजरी झाली. धर्मशाळा येथे त्याने वनडे करिअरमधील पहिला विकेट घेतला. त्यानंतर लखनऊ विरुद्ध दुसऱ्या वनडेत तो खेळला नव्हता. कॅप्टन गिलने यासाठी क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीचं कारण दिलं होतं. पण चेन्नई विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात तो खेळला. 6 ओव्हरमध्ये 42 धावा देऊन एकही विकेट काढला नाही. त्या मॅचमध्ये त्याने बॅटिंग केली नव्हती.
भारताचा आयर्लंड दौरा दोन कारणांमुळे चर्चेत
भारताच्या आयर्लंड दौऱ्याची सुरुवात 26 जूनपासून होणार आहे. बेलफास्ट येथे टीम इंडियात दोन टी20 सामने खेळणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू लंडनवरुन बेलफास्टला जातील. भारताचा आयर्लंड दौरा दोन कारणांमुळे चर्चेत आहे. T20 टीमचा कॅप्टन बनल्यानंतर श्रेयस अय्यरचा हा पहिला दौरा आहे आणि दुसरं कारण आहे वैभव सूर्यवंशीचा डेब्यू पहायला मिळू शकतो. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय अ संघाकडून खेळताना वैभव सूर्यवंशी पहिले चार सामने फ्लॉप ठरला. पण फायनलमध्ये त्याने तडाखेबंद खेळी केली. 29 चेंडूत 94 धावा फटकावल्या.
Leave a Reply