• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

India-Bangladesh : बांग्लादेशची इतकी मजल, भारतीय चिडतील असं काम केलं, बॉर्डरवर वाढलं टेन्शन

August 12, 2026 by admin Leave a Comment


भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव वाढला आहे. तणाव वाढवण्याच्या घटनेसाठी बांग्लादेशी नागरिकांची एक कृती जबाबदार आहे. मंगळवारी काही बांग्लादेशी भारतात घुसले व त्यांनी दोन शेतकऱ्यांचं अपहरण केलं. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्याजवळ ही घटना घडली. सीमावर्ती भागात दोन भारतीय शेतकरी शेतात काम करत होते. त्यावेळी काही बांग्लादेशी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसले. शेतात काम करणाऱ्या दोन भारतीय शेतकऱ्यांचं त्यांनी अपहरण केलं. ओढत, खेचत त्यांना आपल्या हद्दीत घेऊन गेले. एका बांग्लादेशी नागरिक सीमा सुरक्षा दल BSF च्या ताब्यात आहे. त्या 70 वर्षीय बांग्लादेशी नागरिकाची BSF ने सुटका करावी यासाठी बांग्लादेशी नागरिकांनी हे पाऊल उचललं.

BSF वर दबाव आणण्यासाठी त्यांनी हे सर्व केलं. भारतीय नागरिकांचं अपहरण केल्यास सीमा सुरक्षा दलावरील दबाव वाढेल व ते आपल्या नागरिकाची सुटका करतील हे सर्व प्लानिंग त्यामागे होतं. बांग्लादेशातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, BSF आणि बॉर्डर गार्ड बांग्लादेश यांच्यात फ्लॅट मीटिंग झाली. त्यात ठरल्यानुसार, तिन्ही नागरिकांची अदलाबदली करुन सुटका करण्यात आली.

पण बीएसएफने ऐकलं नाही

रिपोर्ट्सनुसार या सर्व वादाची सुरुवात मंगळवारी सकाळी झाली. मेहेरपूर इच्छाखाली बॉर्डरजवळ अब्दुल मन्नान हा बांग्लादेशचा शेतकरी आपल्या पिकांवर किटकनाशकांच्या फवारणीसाठी गेला होता. BSF च्या जवानांनी बॉर्डर नियमांच उल्लंघन केल्याचा आरोप करत अब्दुल मन्नानला ताब्यात घेतलं असं बांग्लादेशी मीडियाचं म्हणणं आहे. अब्दुल मन्नानच्या अटकेची बातमी कळताच त्यांचे नातेवाईक आणि स्थानिक बांग्लादेशी नागरिक चिडले. त्यांनी मन्नानला सोडण्याची विनंती केली पण बीएसएफने ऐकलं नाही, अस मन्नाच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

तात्काळ फ्लॅग मीटिंग

त्यानंतर चिडलेले हे सर्व बांग्लादेशी भारतीय हद्दीत घुसले. शेतात काम करणाऱ्या दोन शेतकऱ्यांना उचललं व आपल्यासोबत घेऊन गेले. या भारतीय शेतकऱ्यांना बीजीबीकडे सोपवलं. सचिन कर्मकार आणि नारायण देब अशी या दोन भारतीय शेतकऱ्यांची नावं आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव वाढल्यानंतर इच्छाखाली सीमेवर लगेच BSF आणि BGB अधिकाऱ्यांची तात्काळ फ्लॅग मीटिंग बोलवण्यात येईल. त्यानंतर अब्दुल मन्नानला बीजीबीकडे सोपवलं तर भारतीय शेतकऱ्यांना बीएसएफकडे सोपवण्यात आलं.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुमची किंमत ओळखा आणि…, फोटो पोस्ट करत काजोलने चाहत्यांना दिला महत्त्वाचा सल्ला
  • Jasprit Bumrah: बुमराहला मिळाली सर्वात मोठी वाईट बातमी, दोन वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की…दबदबाच कमी
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in