200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. देशात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय, निम शासकीय, खासगी कंपन्या, सोसायट्या येथे तिरंगा फडकतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत ध्वजारोहण केले जाते. यावेळी लष्कराकडून काही प्रात्याक्षिके दाखवली जातात. दिल्लीत कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशावासियांना संबोधित करतात. आजही दिल्लीत नरेंद्र मोदी देशावासियांना संबोधिक करणार आहेत. देशातील विविध भागांमध्ये आज 15 ऑगस्टनिमित्त खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजावंदन केले जाते. मोठा उत्साह लोकांमध्ये 15 ऑगस्टनिमित्त बघायला मिळतोय.
Leave a Reply