
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय तिसऱ्या टी20 मालिकेसाठी सज्ज आहे. आयर्लंड आणि इंग्लंडमधील कटू अनुभव मागे टाकून टीम इंडिया श्रेयसच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. श्रेयस अय्यरने नेतृत्व स्वीकारल्यापासून एकही विजय मिळवलेला नाही. त्यामुळे झिम्बाब्वेत तरी पहिला विजय मिळवणार का? याकडे लागून आहे. कारण आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाने आधीच 0-2 ने मात दिली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढणं सहाजिकच आहे. दुसरीकडे, या मालिकेपूर्वी झिम्बाब्वे धक्का बसला आहे. सामन्याच्या काही तासांआधी फलंदाज मिल्टन शुंबा या मालिकेला मुकला आहे. त्याच्या जागी इनोसेंट काइया याला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.
काय म्हणाला श्रेयस अय्यर?
भारतीय संघाचा कर्णंधार श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. मी इथे पहिल्यांदाच आलो आहे, त्यामुळे खेळपट्टी कशी असेल हे मला माहीत नाही. पण सराव खेळपट्ट्या आणि मैदानावरील सराव खेळपट्ट्या पाहता, तिथे चांगला बाऊन्स मिळत होता. त्यामुळे निश्चितच, हा एक महत्त्वाचा पैलू आहे. खेळपट्टी कशी असेल हे मला माहीत नाही, पण तसा अंदाज आहे.
Leave a Reply