
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणाही केली आहे. या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीवीर साई सुदर्शन यांची निवड केली आहे. पण त्यांची उपलब्धता त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयने म्हटले होते. (Photo: PTI)
साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह या दोघांपैकी एक जण पास झाला आहे. बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्सने जसप्रीत बुमराहला पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी परवानगी दिली आहे, असे पीटीआयचं वृत्त आहे. (Photo: PTI)
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पीटीआयने बुमराहच्या प्रकृती सुधारल्याचे वृत्त दिले आहे. “जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला आहे. त्याने सर्व फिटनेस चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. तो संघाच्या रणनीतीचा एक अविभाज्य भाग असून श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यांसाठी उपलब्ध असेल.” (Photo: PTI)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला या पर्वातील उर्वरित नऊ कसोटी सामन्यांपैकी सात सामने जिंकणे आवश्यक आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यापूर्वी भारतासाठी श्रीलंकेत 2-0 ने मालिका जिंकणे महत्त्वाचे आहे. अन्यथा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित कठीण होईल. (Photo: PTI)
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन. (Photo: PTI)




Leave a Reply