• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD Weather Update : नवं संकट! समुद्रात तयार झालं भयानक वादळ… महाराष्ट्रासह 13 राज्यांना पावसाचा अलर्ट

August 28, 2026 by admin Leave a Comment


देशातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर पहायला मिळत आहे. 29 ऑगस्टला रोजी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून ओडिशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील अनेक राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी देशाच्या मोठ्या भागातील हवामान बदललेले दिसू शकते.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेश आणि लगतच्या परिसरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांत कमजोर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्या प्रभावामुळे अनेक भागांत पाऊस सुरूच राहू शकतो. दुसरीकडे, बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे तयार झालेले चक्रीवादळसदृश वाऱ्यांचे क्षेत्र अद्याप सक्रिय आहे. त्याच्या प्रभावामुळे 29 ऑगस्टच्या आसपास उत्तर-पश्चिम बंगालचा उपसागर तसेच पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या परिसरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे पूर्व भारतातील पावसाचा जोर आणखी वाढू शकतो.

दिल्लीत ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता किती?

राजधानी दिल्लीत 29 ऑगस्ट रोजी हवामान तुलनेने दिलासादायक राहण्याची शक्यता आहे. IMD ने दिल्लीत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या राजधानीसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, मान्सून ट्रफ दिल्लीच्या आसपासच्या भागातून जात आहे आणि उत्तर हरियाणावर चक्रीवादळसदृश वाऱ्यांचे क्षेत्रही कायम आहे. त्यामुळे हवामान पूर्णपणे कोरडे राहील, याची खात्री देता येत नाही. काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. 29 ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागांत पाऊस सुरू राहू शकतो. पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशात पावसाचा अंदाज आहे. पूर्व उत्तर प्रदेशात 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा आणखी एक टप्पा पाहायला मिळू शकतो. 1 ते 3 सप्टेंबरदरम्यान पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बिहार-झारखंडमध्येही पावसाचा जोर

बिहारमध्ये 29 ऑगस्ट रोजी मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. IMDने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 28 आणि 29 ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडू शकतो. त्यानंतर 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यानही काही भागांत पावसाची शक्यता आहे. यावेळी मेघगर्जनेसह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. झारखंडमध्येही 29 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ओडिशाला सर्वाधिक धोका

ओडिशात शनिवारी हवामान सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. IMDने 29 ऑगस्ट रोजी काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. यासोबतच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम बंगालपासून ईशान्य भारतापर्यंत पाऊस

पश्चिम बंगालमध्येही हवामान सक्रिय राहण्याची शक्यता आहे. गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्ये 28-29 ऑगस्ट आणि त्यानंतर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम-मेघालय तसेच नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य भारत आणि महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज

मध्य भारतातही पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेशात 28 ते 30 ऑगस्टदरम्यान व्यापक पाऊस पडण्याची शक्यता असून, 29 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. पश्चिम मध्य प्रदेशात 28 ऑगस्ट तसेच 2 आणि 3 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. छत्तीसगडमध्ये 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान पावसाचा सिलसिला सुरू राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढू शकतो. पश्चिम किनारपट्टीवरील कोकण आणि गोव्यात 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान व्यापक पावसाचा अंदाज आहे. गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि सौराष्ट्र-कच्छमध्येही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in