• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Farmer Loan Waiver: 56 लाख शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! प्रतिक्षा संपली…येणार कर्जमाफीचा मॅसेज, 2019 मधील कर्जमाफीतील शेतकर्‍यांना ही मिळणार लाभ?

June 25, 2026 by admin Leave a Comment


Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: पावसाने दमदार बॅटिंग केल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी अजून एक मोठी आनंदवार्ता धडकली आहे. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरी शेतकरी कर्जमाफी योजनेची वेगाने अंमलबजावणी सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मॅसेज येणार आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली.

वन टाईम सेटलमेंट

राज्य मंत्रिमंडळाने 2 जून 2026 रोजी सदर योजनेला मंजूरी दिली होती. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी तर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत मंजूरी देण्यात आली होती. महायुती सरकारने 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे दोन लाखांचे कर्ज माफ करण्याचे धोरण ठरवले आहे. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू केली आहे. सरकारने व्यापारी व संबंधिक बँकांना योजनेतंर्गत निर्देश दिले आहे. थकीत कर्जदार शेतकरी पुन्हा कर्जपात्र ठरणार आहेत.

कर्जमाफी योजनेतील निकष, अटी आणि शर्तींमध्ये बदलासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, सहकारमंत्री यांचा एक मंत्रिगटही कार्यरत आहे. याविषयीची एक उपसमितीही गठीत करण्यात आली आहे. त्यात सचिव आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आमदार रोहित पवार, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतलेल्या आक्षेपांवरही चर्चा झाल्याचे समजते.

2019 मधील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा फायदा?

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12.71 लाख शेतकऱ्यांना सुद्धा नवीन कर्जमाफी योजनाचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारने या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री लवकरच जाहीर करतील, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रिगट उपसमिती

कर्जमाफी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या योजनेचा आढावा घेणे आणि योजनेच्या निकषात बदल करण्यासाठी हा मंत्रिगट काम करेल. समितीत दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल, वैद्यकीय शिक्षण, कृषी आणि सहकार मंत्र्यांचा समावेश आहे. ही समिती या योजनेचा नियमित आढावा घेईल. हा मंत्रिगट कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभाविषयी सातत्याने आढावा घेईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती
  • 91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in