
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी शेतकरी कर्जमाफी योजनेत वितरीत करण्यात आले. आता पुढील टप्प्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. अनेक तांत्रिक आणि कागदपत्रातील त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी योजनेचाल लाभ मिळण्यास उशीर होऊ शकतो. हेअरकटचा मुद्दा सुटला आहे. पण एक अडचण समोर आली आहे. पीक कर्ज घेतलेल्या काही शेतकरी कर्जमाफीच्या निकषात बसतात. पण ते आज हयात नाहीत. त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळेल का?
वारस नोंद केल्यास कर्जमाफीचा फायदा
कर्जमफीच्या निकषात बसणारे पण मयत शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मयत शेतकऱ्याच्या वारसदाराचे नाव महसुली दप्तरी नोंद करावी. नंतर त्याची पूर्तता सेवा संस्था आणि राष्ट्रीयकृत बँकेत करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. यासंबंधीच्या काही तक्रारी असतील तर शेतकऱ्यांना तालुक्यातील सहाय्यक निंबधक, सहकार खाते यांच्याकडे संपर्क साधता येईल.
कर्जमुक्ती दोन टप्प्यात
पु्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 7 ऑगस्ट रोजी रक्कम वितरीत करण्यात आली. 5,029 कोटी रुपये, राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. ही पीक कर्ज खाती आता निरंक झाली आहेत. कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यात होणार नाही तर ती दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचे पैसे देण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.
आधार प्रमाणिकरण महत्त्वाचे
कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागेल. त्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही . ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण प्रक्रियेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची आणि प्रोत्साहन पर रक्कम जमा होईल. शेतकऱ्यांची कर्जखाती नील होईल. त्यांना नव्याने पीक कर्ज घेता येईल. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल. त्यात प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
Leave a Reply