• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Devendra Fadnavis : शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी होऊ शकतो, पण..मुख्यमंत्र्यांनी कुठली टेक्नोलॉजी वापरण्याचा दिला सल्ला?

August 28, 2026 by admin Leave a Comment


“नाशिक जिल्हा हा शेतीच्या बाबतीत प्रगतीशील जिल्हा आहे. शेती, फळबागा या क्षेत्रात झालेली प्रगती विलक्षण आहे. इथला शेतकरी अतिशय मेहनती आहे. आदिवासी भागात वेगवेगळ्या प्रकारची वनउपज करणारा आमचा जिल्हा आहे. आज आपण द्राक्षाचा विचार केला, तर देशाच्या द्राक्ष निर्यातीत एकूण 80 टक्के निर्यात नाशिकमधून होते. नाशिकने हे कमावलेलं नाव आहे” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या शेतकऱ्याचं कौतुक केलं. दिंडोरीत नूतन कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. “आमच्या माता-भगिनींच्या डोळ्यात माहित नाही पण नाशिकचा कांदा आमच्या डोळ्यात मात्र वर्षातून दोनदा पाणी आणतो. संपूर्ण देशात नाशिकचा कांदा अतिशय प्रसिद्ध आहे. लासलगावसारखं कांद्याचं केंद्र आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“कांद्याला चांगले भाव असल्याने कोणी कांदे घेऊन आला नाही. वर्षातून एकदातरी कांदे भेट मिळतात. आता कांदे भेट मिळाले असते तर घरी नेले असते. भाव पडतात तेव्हा कांदे भेट मिळतात. निश्चित तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “शेतमालाचा भाव जेव्हा कमी होतो, तेव्हा होणारं दु:ख, त्याचे परिणाम आम्ही पाहतो. आज सगळ्यात महत्वाचं शेती क्षेत्रात तंत्रज्ञान येणं महत्वाचं आहे” असं फडणवीस म्हणाले. “आपली लोकसंख्या, परिवार वाढले, आपल्या राज्यात 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे. शेतकरी अल्पभूधारक असल्याने शेतकऱ्याची गुंतवणूक क्षमता कमी आहे” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ” AI च्या वापर केला तर उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी करु शकतो. APP मध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा मिळेल

“शेती क्षेत्रात संशोधन, तंत्रज्ञान येणं गरजेचं आहे. इतक्या सुंदर महाविद्यालयावर माझा विश्वास आहे, पुढच्या काळात शेतीत संशोधन होईल, त्या संशोधनाचं केंद्र हे महाविद्यालय असेल. त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा मिळेल. शेती क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरु आहे” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टी क्षमतेने कशा वापरता येतील. जी राज्य उत्पादकतेत खूप पुढे होती, ती उत्पादकतेच्या अंतिम सीमेवर पोहोचली आहेत. मोठ्या प्रमाणात रासायनिक खत वापरामुळे ती क्षमता कमी झाली आहे” असं मुख्यमंत्री म्हणाले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in