
दिल्ली कॅपिट्ल्सने 25 एप्रिलला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये पंजाब किंग्स विरुद्ध आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील आपली सर्वोच्च 264 धावसंख्या उभारली होती. मात्र 48 तासांतच दिल्लीची गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर दुर्दशा झाली. दिल्लीला आपल्या मोहिमेतील 8 व्या सामन्यात संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. आरसीबीने दिल्लीला अरुण जेटली स्टेडियममध्ये 21 बॉलआधी ऑलआऊट केलं. आरसीबीसमोर दिल्लीचं 16.3 ओव्हरमध्ये 75 रन्सवर पॅकअप झालं. त्यामुळे आरसीबीला 76 धावांचं आव्हान मिळालं. आरसीबीने हे आव्हान 81 बॉलआधी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. आरसीबीने 6.3 ओव्हरमध्ये 77 धावा केल्या. आरसीबीने अशाप्रकारे 9 विकेट्सने दिल्लीचा धुव्वा उडवला. आरसीबीने यासह 19 व्या मोसमातील आपला सहावा विजय मिळवला. तर दिल्लीचा घरच्या मैदानातील हा या हंगामातील तिसरा पराभव ठरला.
Leave a Reply