• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा

September 1, 2026 by admin Leave a Comment


नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये काढण्यात येणारे आंदोलन आता मागे घेण्यात आले आहे. सीजेपीचे नेते सौरभ दास यांनी सुप्रीम कोर्टात याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आणि पेपरफुटी प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नीट परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. सरकारी यंत्रणेविरोधात विद्यार्थ्यांकडून आणि विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीने तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतर-मंतरवर महिनाभराहून अधिक काळ आंदोलन केले होते. त्यानंतर संसदेच्या दिशेने मोर्चाही काढण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याचा, तर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर 25 जुलै रोजी सीजेपीने आंदोलन मागे घेतले होते. त्यावेळी सरकारकडून आंदोलकांना काही आश्वासने देण्यात आली होती. मात्र, या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नसल्याचा दावा करत सीजेपीने पुन्हा आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार 5 सप्टेंबर रोजी दिल्लीतील इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते.

दरम्यान, या आंदोलनाच्या काही दिवस आधीच सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आणि नीट पेपरफुटी प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याच्या मुद्द्यावर सुनावणी झाली. यावेळी सरकारने विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यास तयार असल्याची भूमिका मांडली. तसेच, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

सरकारच्या या भूमिकेनंतर सीजेपीचे नेते सौरभ दास यांनी सुप्रीम कोर्टात 5 सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन मागे घेत असल्याची माहिती दिली. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीमध्ये पुन्हा होणारा सीजेपीचा मोर्चा आता होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
  • खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in