
सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्या कॉक्रोच टीपण्णीवरुन देशात कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवरुन इन्स्टाग्रामवर कॉक्रोच अकाऊंट काढलं. त्याला तरुणाईकडून तुफान प्रतिसाद मिळाला. त्यातून कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली. या कॉक्रोच टिपण्णीवर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी पाहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं आहे. डीडी न्यूजच्या मुलाखातीत ते यावर बोलले आहेत.
“मी केलेल्या टीपण्णीचा दुरूपयोग करण्यात आला. मी जे बोललो नाही ते सांगितल गेलं, की मी बोललो आहे. माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीनं दाखवत देशातील तरूणांना भ्रमित करण्याचा क्रूर प्रयत्न करण्यात आला” असं सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले.
“हे अत्यंत दुर्देवी असल्याचं सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी आपल्या मुलाखातीत सांगितलं. माझ्या वक्तव्याला मिसकोट काही लोकांनी केलं, चुकींच्या पद्धतीनं त्याचा उपयोग केला. जे लोक असं करतात मला सांगायचं आहे ते समाजाचे अभिन्न अंग आहेत. तुम्ही मीडीयात , सोशल मिडीयात , प्रिंट मिडीयात आहात किंवा तुम्ही नागरिक असाल. आपल्यावर कायदेशीर, सामाजिक आणि संविधानिक जबाबदारी आहे” असं सुर्यकांत म्हणाले.
तेव्हा आपण जबाबदा-यावर बोललं पाहिजे
“जेव्हा आम्ही अधिकाराबद्दल बोलतो तेव्हा आपण जबाबदा-यावर बोललं पाहिजे. सगळ्यांनी आपली जबाबदारी लक्षात ठेवली पाहिजे. समाजात एकी राहीलं असा प्रयत्न आपण केला पाहिजे” असं सुर्यकांत बोलले.
Leave a Reply