
“बाबरी मशीद पाडली तेव्हा हिंदू समाजाच्या मागे कोण उभं राहिलं, ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राम मंदिर उभारण्यासाठी तुमचं योगदान काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांना भाजप नेते विचारू लागलेत” अशी टीका ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी केली. उद्धव ठाकरे यांची झालेली निवड ही प्रभू रामचंद्रांनी चोरी उघड करण्यासाठी केली आहे, असा दावा विक्रांत जाधव यांनी गुहागरमधील पत्रकार परिषदेत केला. गुहागर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी प्रभू रामांच्या आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये आरत्या करण्याचा नियोजन ठाकरे गटाकडून करण्यात आल्याची माहिती आहे. विक्रांत जाधव यांनी माध्यमांना ही माहिती दिली. विक्रांत जाधव हे भास्कर जाधव यांचे पुत्र आहेत.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply