उन्हाळा सुरु झाला की शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी केवळ साधे पाणीच नव्हे तर नारळाचे पाणी आणि इतर अनेक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबाच्या पाण्याचाही सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याचबरोबर नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते उन्हाळ्यासाठी एक उत्तम पेय मानले जाते. आता प्रश्न असा आहे […]
गावाचं नाव इतकं विचित्र की गावकऱ्यांना पण सांगायला वाटते लाज, शेवटी…
नाव ही कोणत्याही व्यक्तीची किंवा ठिकाणाची ओळख असते, मात्र कधी-कधी हेच नाव अडचणीचे ठरू शकते. अशीच एक घटना ऑस्ट्रियामधील एका गावाबाबत समोर आली आहे. या गावाचे नाव घेताना देखील गावातील लोक लाजतात. या गावाचे जुने नाव Fucking असे होते, ज्यामुळे ते सोशल मीडियावर सतत चर्चेत राहायचे. परदेशी पर्यटक या नावामुळे आकर्षित होऊन गावाच्या साइनबोर्डजवळ फोटो […]
IPL 2026: सर्वाधिक विकेट घेऊनही 5 दिग्गज खेळाडू पर्पल कॅपपासून वंचित, बुमराहसह या गोलंदाजांचा समावेश
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मागच्या 18 पर्वात काय झालं? याची आकडेमोड केली जात आहे. आतापर्यंत 18 पर्वात 15 गोलंदाजांनी पर्पल कॅप मिळवली आहे. एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांना हा मान मिळतो. (Photo- TV9 Network Kannad वरून) जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. टी20 वर्ल्डकप 2024 […]
Pune News | पुणे पुन्हा हादरलं! क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धेच्या बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भैरवनाथ मैदान परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट स्पर्धेचा बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बैठकीदरम्यानच दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद वाढला आणि […]
कुटुंबाला धक्का! या महिलेने मृत्यूपूर्वी 72 कोटींची संपत्ती केली बॉलिवूड अभिनेत्याच्या नावावर, कारण…
Bollywood Actor : बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल चाहत्यांमध्ये असलेले वेड कधी-कधी आश्चर्यचकित करणारे असते. आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. अशाच एका धक्कादायक आणि भावनिक घटनेने काही वर्षांपूर्वी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, ज्यामध्ये एका महिला चाहत्याने आपली संपूर्ण मालमत्ता थेट अभिनेता संजय दत्तच्या नावावर केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या निशी हरिश्चंद्र त्रिपाठी या […]
भारतातील एकमेव स्टेशन जे दोन जिल्ह्यामध्ये आहे, अनेकांना माहिती नाही नाव
भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सोयीस्कर, फायदेशीर आणि सुरक्षित प्रवासामुळे अनेकजण ट्रेनलाच प्राधान्य देतात. देशात हजारो रेल्वे स्थानके आहेत, मात्र काही स्थानके त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे विशेष चर्चेत असतात. असेच एक अनोखे रेल्वे स्टेशन जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे […]