बुधवारी दिल्ली स्थित भारत मंडपममध्ये एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. 2014 ला जो गरीब वर्ग होता, तो आता नवा मध्यम वर्ग बनला आहे, आम्ही या न्यू मीडिल क्लासला कधीही निराश करणार नाही, त्यांचा आम्ही विकास करू, माझ्यासाठी जनता जनार्धनचं देवाचं स्वरुप आहे, हे मी माझं भाग्य […]
Vastu Shastra : देवपूजा करताना कधीही करू नये या 5 चुका , होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान
कोणत्याही घरी देवघर हे घरातील सर्वात मोठं सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं. देवघरातून नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होत असते, या ऊर्जेचा सकारात्मक परिणाम हा तुमच्या आयुष्यावर पडतो आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं. परंतु वास्तुशास्त्रानुसार देवपूजेचे काही नियम असतात. त्याचं पालन केलं तरच तुम्हाला इच्छित फळाची प्राप्ती होते. मात्र तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने […]
GK: भूक लागल्यावर इतका राग का येतो? यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?
आपल्याला जगायचं म्हंटलं तर शरीराला अन्न आणि पोषक द्रव्ये मिळणं गरजेचं आहे. अन्न ही आपली पहिली मूलभूत गरज आहे. त्यानंतर इतर गरजा लागू पडतात. आपल्या पोटात वेळच्या वेळी अन्न पडलं तर आपल्याला सक्रिय आणि उत्साही राहण्यास मदत होते. अनेक जण काही काळ उपवास वगैरे करतात. पण उपवास सोडेपर्यंत मन अस्वस्थ असतं. उपाशी पोटी असताना काही […]
IND vs ENG : थोड्यासाठी हुकलं, टीम इंडियाचा अवघ्या 5 धावांनी पराभव, ऋचा घोषची खेळी व्यर्थ
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी टीम इंडियाने वेस्ट इंडिजला सराव सामन्यात पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाकडे मुख्य स्पर्धेआधी सलग दुसरा सराव सामना जिंकण्याची संधी होती. मात्र भारतीय संघाची ही संधी अवघ्या 5 धावांनी हुकली. टीम इंडियासमोर दुसऱ्या सराव सामन्यात इंग्लंडचं आव्हान होतं. उभयसंघातील या सराव सामन्यांचं आयोजन हे कार्डीयामधील सोफीया गार्डन्समध्ये करण्यात […]
मोठी बातमी! ममता बॅनर्जींच्या तब्बल 19 खासदारांचे बंड? यादी पहिल्यांदाच समोर
TMC MP Revolt : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यांचा पक्षाची शकलं होण्याची दाट शक्यता आहे. साधारण 58 आमदार त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. आमदारांच्या बंडानंतर आता खासदारदेखील बंड करणार असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसचे एकूण 19 खासदार बंड करण्याच्या तयारीत […]
मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिका बंद पडली, नाना पाटेकर, प्राजक्ता माळी कुठे आहेत? आव्हाडांचा सवाल; रोहित पवार आणि आव्हाडांकडून मदत जाहीर
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ बंद पडल्याने राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत मालिकेला आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मालिकेत अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. रोहित पवार यांची […]