• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : घरात नवीन तुळशीचं रोप कधी लावावं? काय आहेत नियम?

June 26, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तुळस हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं अत्यंत आवडतं झाड आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस असते, अशा घरावर सदैव लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची कृपा राहते, अशा घरात कधीही पैशांची कमी नसते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. तसेच ज्या घरात तुळस असते त्या घरात सतत सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत राहते, अशा घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही, असंही वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जर तुळस असेल तर तिला सकाळी अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी जल अर्पण करून तुळशीची पूजा करावी, तुळशीजवळ दिवा लावावा. त्यानंतर दररोज संध्याकाळी देखील न चुकता दिवा लावावा. तसेच घरात तुळस कधी लावावी, कोणत्या मुहूर्तावर लावावी याचे देखील काही नियम आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

घरात तुळस कधी लावावी? घरात नवीन तुळस लावण्यासाठी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवस उत्तम मानले जातात. तसेच कार्तिक महिना आणि एकादशीला देखील तुळस लावने हे अतिशय शुभं मानले जातं. या दिवशी घरात तुळस लावल्यास घराची भरभराट होते, घरात सुख, शांती समृद्धी येते, असं वास्तुशास्त्रत सांगण्यात आलं आहे. तुळस लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, सोमवारच्या दिवशी कधीही घरात तुळस लावू नये, सोमवार सोडून इतर कोणत्याही वारी घरात तुळस लावली तरी चालते.

सुकलेल्या तुळशीचं काय करावं? अनेकदा आपल्या घरात असलेली तुळस अचानक सुकून जाते. अशावेळी या सुकलेल्या तुळशीचं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकजण तर सुकलेली तुळस ही कुंडीमध्ये तशीच पडू देतात. परंतु सुकलेली तुळस कधीही कुंडीमध्ये तशीच ठेवू नका, तर तिला बाजूला करून तिच्या जागी त्या कुंडीमध्ये नवीन तुळशीचं झाडं लावा. जी सुकलेली तुळस आहे, ती गंगेमध्ये सोडून द्या आणि तिचं दर्शन करा, प्रार्थना करा असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे.

ही चुक करू नका – वास्तुशास्त्रानुसार जिथे तुळस आहे, तिथे कायम स्वच्छता ठेवा, तुळशीजवळ नियमित दिवा लावा, तसेच तुळशीच्या जवळ कधीही झाडू ठेवू नका, तसेच चपला बूट देखील ठेवू नका, तसेच एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीची पानं तोडू नका, तुळशीची पानं ही भगवान महादेवांना अर्पण करू नयेत, तुळशीची पानं ही भगवान विष्णू, लक्ष्मी माता आणि रंगनाथ यांना अर्पण करणं हे अतिशय शुभ मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अयोध्येच्या राम मंदिरासाठी तुम्ही चांदीची विट दिली याला काय पुरावा आहे? नितेश राणेंचा ठाकरेंच्या सेनेला सवाल
  • केतन अग्रवाल मर्डर प्रकरण, सियाच्या भावावर पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती, 8 तासांपासून चौकशी
  • आम्ही तिघे भेटलो हीच… उद्धव ठाकरे-संजय राऊत यांच्यासोबत प्रवास करताना CM फडणवीसांचे मोठे विधान
  • IRE vs IND : लॉर्कन टकर-गॅरेथ डेलानीची फटकेबाजी, टीम इंडियासमोर 183 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • चालत्या बाईकवरुन मुल पडले, आई-वडीलांना कळलंच नाही, दारुच्या नशेने…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in