
सासरी नांदनाऱ्या मुलींचा छळ होत असेल तर, त्यांना ताबडतोब आई – वडिलांनी घरी आणा… मुलीचा मृतदेह पाहण्यापेक्षा मुलगी आई – वडिलांच्या घरी जिवंत तरी राहिल… असं अनेक जण म्हणतात. पण आता असं काही घडलं आहे, ज्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. कुणाल चांदगुडे आणि आई – वडिलांच्या निधनाची घटना ताजी असताना राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी देखील किल्ल्यावरुन तीन मुलांसह टोकाचं पाऊल उचललं. समोर येत असलेल्या माहितीनुसार अश्विनी यांचा पती सतत त्यांच्यावर संशय घेत असे. याच संशयामुळे अश्विनी यांना मेहनतीने मिळवलेल्या नोकरीचा देखील त्याग करावा लागला. अखेर सततच्या जाचाला कंटाळून अश्विनी यांनी तीन मुलांसह किल्ल्यावरून उडी मारली आणि सर्वकाही संपवलं…
समोर आलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचे वडील तान्हाजी शिवाजी मोहिते यांनी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. दाखल केलेल्या तक्रारीत सांगितल्यानुसार, आम्ही मुलीचा संसार मोडू नये म्हणून तिला समजावून सांगत होतो…
समोर येत असलेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी अश्विनी यांनी नोकरी सोडली होती आणि त्या उमरगा येथे मुलगा अजिंक्य आणि मुलगी विरा यांच्यासोबत माहेरी राहत होत्या. सासरच्या जाचाला कंटाळून अश्विनी आई – वडिलांच्याच घरी राहत होत्या. दरम्यान, अश्विनी यांचा पती मनोहर अंकुश पौळ, सासरे अंकुश पौळ, सासू कालिंदाा पौळ आणि आत्या विमलाबाई… हे सासरचे मंडळी सतत अश्विनी यांना फोन करायचे…
फोन करायचे आणि म्हणायचे, ‘तू माहेरी का राहतेय, तू आमच्या घरी ये आणि याठिकाणी मोलकरणी म्हणून राहा…’, पुढे अश्विनी यांचे वडील म्हणाले, ‘ती आम्हाला सतत म्हणायची, ती आम्हाला वारंवार बोलायची मी माझं आणि माझ्या मुलांच्या जीवाचं बरं वाईट करुन घेईल. त्यावेळी मी माझा मुलगा आणि पत्नी अश्विनीला कायम सांगायचो की असं करु नकोस… तिला आम्ही सतत समजून सांगितलं…’, असं देखील अश्विनी यांचे वडील म्हणाले…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी या मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये नोकरी करत होत्या. अश्विनी राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट महिला कुस्तीपटू होत्या. पण पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरुन अश्विनी यांनी काही महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा देखील दिलेला. मागील तीन महिन्यांपासून त्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या. पोलीस याप्रकरणी सध्या कसून चौकशी करत आहे.
Leave a Reply