• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Arvind Kejriwal : मी जस्टिस स्वर्णकांता यांच्या कोर्टात जाणार नाही, अरविंद केजरीवाल यांच्याकडून सत्याग्रहाची घोषणा

April 27, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची मद्य घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाविरोधात तपास यंत्रणेने दिल्ली उच्च न्यायालयत अपील केलं. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांचं खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. आता अरविंद केजरीवाल यांनी जस्टिस स्वर्णकांता शर्मा यांच्या कोर्टात हजर होणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यांनी या संदर्भात जस्टिस स्वर्णकांता शर्मा यांना पत्र लिहिलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी जस्टिस स्वर्णकांता यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘ते स्वत: किंवा वकिलाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर हजर होणार नाहीत’ ‘जस्टिस स्वर्णकांता यांच्याकडून न्याय मिळण्याची माझी अपेक्षा संपली आहे’ असं ते म्हणाले. म्हणून महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गावर चालण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. आम आदमी पार्टीचे ते राष्ट्रीय संयोजकही आहेत. जस्टिस स्वर्णकांता यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार मी माझ्याकडे राखून ठेवला आहे असही ते म्हणाले. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन बेंच बदलण्याचं अपील केलं होतं. त्यांनी जस्टिस स्वर्णकांता शर्मा यांना या केसची सुनावणी बंद करण्याच आवाहन केलं होतं.

केजरीवालांचा जस्टिस स्वर्णकांता यांना विरोध का?

जस्टिस शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिवक्ता परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा हवाला देत अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘न्यायाधीश जर त्या विचारधारेचा समर्थक आहे आणि मी विरोधक, तर मला न्याय कसा मिळेल?’ या प्रकरणात कायदेशीर लढाईऐवजी आपण नैतिक आणि वैचारिक विरोधाच्या मार्गाने जाणार आहोत असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

In all humility and with complete respect for judiciary, I have written the following letter to Justice Swarna Kanta Sharma, informing her that pursuing Gandhian principles of Satyagraha, it won’t be possible for me to pursue this case in her court, either in person or through a… pic.twitter.com/HmyOyNYug8

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 27, 2026

स्वर्ण कांता शर्मा काय म्हणाल्या?

“फक्त शंकेच्या आधारावर कोणालाही कोर्टाकडून दिलासा मिळणार नाही. कुठलाही जज कुठल्याही प्रकरणापासून स्वत:ला वेगळं करु शकत नाही” असं न्यायाधीश शर्मा म्हणाल्या. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळून लावली. “केजरीवाल यांना दिलासा मिळाला नाही, तर ते बोलणार की, अशा निर्णयाची मी आधीच भविष्यवाणी केली होती. तेच उद्या दिलासा मिळाला तर कोर्टाने दबावाखाली निर्णय दिला असही ते बोलू शकतात” असं स्वर्ण कांता शर्मा म्हणाल्या.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विजय माल्यामुळे दीपिका – कतरिना एका रात्रीत बनल्या स्टार, कॅलेंडरसाठी बिकिनी फोटोशूट आणि… ‘बिग बॉस’फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा
  • Sanjay Nirupam Full Press | मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची सरकारकडे पत्राद्वारे मागणी
  • LSG vs KKR : प्रेम, दु:ख, अभिमान, भावनांचा संगम, केकेआरच्या विजयापेक्षा रिंकू सिंहच्या भावी पत्नीच्या इमोशन्सची जास्त चर्चा VIDEO
  • आधी मराठी माणसाला सक्ती करा..; रिक्षाचालकांना भाषा सक्तीवरून मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत
  • तुरुंगात लिहिली गेली 33 वर्षे जुन्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सीक्वलची कथा, 4000 कैद्यांनी दिली आयडिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in