• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Antilia explosive case: सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा याच्या सह १० जणांवर आरोपनिश्चित, आता खटला चालणार

August 1, 2026 by admin Leave a Comment


मुंबईत महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात गाजलेल्या एंटीलिया स्फोटक आणि व्यापारी हिरेन हत्याकांड प्रकरणात शनिवारी मोठा कायदेशीर घडामोड घडली आहे. या खटल्यात अखेर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA)माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि अन्य आठ आरोपींच्या विरोधात आरोपनिश्चित केले आहेत.कोर्टाच्या या निर्णयानंतर आता सर्व आरोपींच्या विरोधात नियमित खटल्याला सुरुवात होणार आहे.

विशेष (NIA) कोर्टाने न्यायाधीश चकोर बावीस्कर यांनी सर्व आरोपींच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) खूनाच्या कलमासह अन्य गंभीर कलमांसह गैरकायदेशीर कारवाया प्रतिबंध अधिनियम (UAPA)अंतर्गतही आरोप निश्चित केले आहेत. कोर्टात आरोप वाचवून दाखवल्यानंतर सर्व आरोपींनी स्वत:ला निर्दोष सांगितले आणि आरोपांची इन्कार केला. आता कोर्टात सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्या पुराव्यांआधारे या प्रकरणाची पुढील सुनावणी सुरु होणार आहे.

२५ फेब्रुवारी २०२१ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या द.मुंबईतील निवासस्थान एंटीलियाच्या समोर एक बेवारस स्कॉर्पिओ सापडली होती. त्या कारमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली होती. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले.
ज्या स्कॉर्पिओत स्फोटके होती तिचा मालक मनसुख हिरेन याने होता,त्याने आपली गाडी चोरीला गेल्याचा आरोप केला होता. मात्र, या खुलाशानंतर ५ मार्च २०२१ रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. त्यानंतर एनआयएने स्फोटके आणि मनसुख हिरेन याच्या हत्येचा तपास सुरु केला.

एनआयएच्या आरोपानुसार माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार होता. एंटीलियाच्या बाहेर स्फोटकाची कार पार्क करण्यात वाझे याचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले. देशातील प्रतिष्ठीत उद्योजकांमध्ये भीती निर्माण करुन त्यांच्याकडून खंडणी वसुल करण्याचा हा कट होता. राजकीय नेतृत्वाकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य पोलिसांना दिले होते.त्यासाठी ही योजना आखली होती.

एनआयएने तपासात दावा केला की सचिन वाझे याला त्याची सुपरकॉपवाली प्रतिमा निर्माण करायची होती. त्यामुळे त्याने हा कट रचला होता. मात्र, व्यापारी मनसुख हिरेन स्फोटकांची जबाबदारी घेण्यास तयार न झाल्याने तो फूटु नये म्हणून त्याचा काटा काढण्यात आला. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपाने अनेक आरोप केल्याने हे प्रकरण गाजले होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in