
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्याच्या काळात अनेक जण आपल्या घरात किंवा बागेमध्ये वेगवेगळी झाडं लावत असतात. अनेकांना बागेची आवड असते. पावसाळ्याच्या काळात अनेक जण सुंदर सुंदर फुलांची आणि फळांची झाडं लावतात. परंतु यातील काही झाडांची नैसर्गिक रचनाच अशी असते की या झाडांकडे साप आकर्षित होतात. पावसाळ्यात तर धोका आणखी वाढतो. कारण पावसाळ्यात सतत या झाडांखाली ओल असते, तसेच सर्वत्र गवत देखील वाढलेलं असतं, त्यामुळे सापांना लपण्यासाठी सहज जागा उपलब्ध होते. सापांबद्दल अनेकाच्या मनात हा मोठा गैरसमज असतो की, साप झाडांना असलेल्या फुलांच्या वासामुळे त्याकडे आकर्षित होतात, परंतु हा गैरसमज आहे. साप वासामुळे या झाडांकडे आकर्षित होत नाहीत. तर पावसाळ्याच्या काळात सापांना या झाडाखाली सुरक्षित वातावरणाची निर्मिती होते, म्हणून साप अशा झाडांकडे आकर्षित होतात.
यातीलच एक झाड आहे, ते म्हणजे कन्हेराचं झाड, या झाडाला सुंदर अशी लाल फुलं येतात. परंतु पावसाळ्याच्या काळात हे झाड धोकादायक ठरू शकतं. कारण हे झाड उंच वाढतं, तसेच या झाडाखाली पानांमुळे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. झाडाला दाट पानं असल्यामुळे झाडाखालची जमीन देखील पावसामुळे भिजत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात सापांना या झाडाखाली लपण्यासाठी सुरक्षित जागा सापडते. या झाडाच्या मुळाशी साप लपतात. तसेच पावसाळ्याच्या काळात झाडाच्या आजूबाजुला गवत वाढल्यामुळ झाडाखाली साप असल्याचं देखील लवकर लक्षात येत नाही, त्यामुळे शक्यतो असे झाडं घरापासून थोड्या दूर अंतरावरच लावावेत. तसेच पावसाळ्याच्या काळात अशा झाडांची मशागत करताना किंवा तिथे जाताना योग्य ती काळजी घ्यावी, पायात नेहमी बूट घालूनच जावे, ज्यामुळे तुमचा बचाव होऊ शकेल.
पावसाळ्याच्या काळात अनेकदा साप बाहेर फिरताना दिसतात. कारण पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळात पाणी शिरतं. तसेच हा काळ अनेक प्रजातीच्या सांपाच्या प्रजननाचा काळा देखील असतो, त्यामुळे साप अधिकच आक्रमक बनतात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं असतं.
Leave a Reply